Wednesday, 12 July 2017

माय मराठीचे मरण   

संपूर्ण शिक्षण मराठीत झाल्यानंतरही माझं कधीच, कुठेच, काहीच अडलं नाही. इतरांप्रमाणे अस्खलित इंग्रजी येतही नसेल, पण म्हणून अाम्हाला कोणी अडाणी म्हणून संबोधलं नाही. एवढंच कशाला, ग्लोबल होण्यासाठी अाम्हीही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलं पण त्यामध्ये कधी अाम्हाला अामची भाषा अाड अाली नाही. मग अाजच का मराठीचे वावगं वाटू लागलं अाहे लोकांना. केवळ मराठीच नव्हे तर सगळ्याच मातृभाषा अाता लयाला जाऊ लागल्यात असं वाटू लागतंय. काही दिवसांना मराठी शाळा किंवा एकूणच मातृभाषेच्या शाळा नक्कीच बंद होतील.
काही दिवसांपूर्वी विरारच्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या मुख्यध्यापिकांशी माझं बोलणं झालं. जेव्हा ती शाळा सुरू झाली होती तेव्हा त्या शाळेत जवळपास एका-एका वर्गात ६०-७० विद्यार्थी असत. कधी-कधी तर इतके प्रवेश यायचे की आम्हाला त्या प्रवेश रद्द कराव्या लागयाच्या, पण अाज या शाळेची एवढी परिस्थिती वाईट झाली अाहे की अाम्हाला घराघरात जाऊन विद्यार्थ्यांना अाणावं लागतंय. ज्या ठिकाणी एका वर्गात ६०-७० विद्यार्थी होते त्याठिकाणी अाता संपूर्ण शाळेतही ६०-७० विद्यार्थी नाहीत. हे सारं त्या अगदी डोळ्यात पाणी अाणून सांगत होत्या. अाज प्रत्येक मराठी शाळेची हीच अवस्था अाहे. अाम्ही अामच्या मुलांना इंग्रजी माध्यमात नाही घातलं तर अामची मुलं ग्लोबल कशी  होणार?, पुढे कशी जाणार? हाच विचार पालकांच्या मनात अाहे. पण कितीतरी मराठी माध्यमांत शिकलेली मुलं खूप पुढे गेलीत हे त्यांना कसं समजणार?. काही मराठी शाळाचं खाजगीकरण करून त्या इंग्रजी संस्थाना विकाण्याचा घाट पालिका घालतेय. शासन स्थरावरच जर मराठी शाळा बंद होण्यासाठी प्रयत्न होत असतील तर या शाळा जिवंत तरी कशा राहणार? परप्रातांत स्थायिक झालेले मराठी बांधव अापल्या मुलांना मराठी यावं याकरता धडपडतायत. त्यांच्यासाठी मराठी क्लासेस कुठे मिळतील का याचा शोध घेतायत. परप्रांतात स्थायिक झालेल्या मराठी गृहीणी या मराठी शिकवणी घेतात. यामध्ये त्यांना बक्कळ पैसाही मिळतो. पण अापल्याच देशात मराठी मरावी याकरता का धडपड केली जातेय. पाचवीतल्या एका इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलीला मी विचारलं बाई गं तुझी मातृभाषा कोणती? ती डोळे वटारुन माझ्या बघू लागली. नंतर म्हटलं अापलंच चुकलं. मी तिला इंग्रजीत विचारायला हवं होतं. व्हॉट इज युवर मदरटँग, तेव्हा ती चटकन म्हणाली, इंग्लिश. येथेच सारं संपलं. मराठी घरात जन्माला अालेली मुलगी जर मातृभाषा इंग्रजी सांगत असेल तर अाता मराठी शाळांची काहीच गरज नाही असं वाटतंय. अापल्या मुलांना ग्लोबल होण्याच्या नादात अापण अापली संस्कृती, अापली भाषा विसरतोय हे लोकांना कळत नसेल का ?
परवा ट्रेनमध्ये एक मुलगी बॅगच्या अात लपून काहीतरी करतेय असं दिसलं. मी जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मुलगी पुस्तक वाचत होती. मी तिला म्हटलं पुस्तकंच वाचतेयस ना, मग असं लपून का. तेव्हा ती म्हणाली मराठी पुस्तक अाहे ना म्हणून. दोन मिनीटं डोळ्यात पाणी अालं. म्हटंल मराठी बोलणाऱ्यांना तर लाज वाटत होती अाणि अाता मराठी वाचण्याची लोकांना लाज वाटू लागलीय. ट्रेनमध्ये वाचन करण्याऱ्या महिलांपैकी ७० ते ८० टक्के इंग्रजी पुस्तकं असंतात. पण मला कधीच मराठी पुस्तक ट्रेनमध्ये वाचण्याची लाज वाटली नाही. यापेक्षाही माझा अनुभव फार वेगळा अाहे. पु. ल. देशपांडे याचं मी व्यक्ती अाणि वल्ली हे पुस्तक वाचत असताना एक मराठी नसलेली पण मराठी वाचता येणारी मुलगी माझ्याशेजारी बसली होती. ती बहुतेक चेतन भगतचं  हाल्फ गर्लफ्रेंड हे पुस्तक वाचत होती. तिचं लक्ष माझ्या पुस्तकाकडे गेलं अाणि ती तिचं पुस्तक सोडून माझं पुस्तक वाचू लागली. मराठी अाणि एकंदरीतच मातृभाषेला अापण एवढं कमी लेखतो अाहोत की अापल्याला अाता या भाषांची लाज वाटू लागलीय. छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ अापटे यांच्यापासून ते कुसूमाग्रज, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, असे कितीतरी दिग्गजांनी मराठी भाषा समृद्ध करून ठेवली अाहे.पण किती लोकांना मराठीतल्या पुस्तकांविषयी माहित असेल? असो, मातृभाषा विरूद्ध इंग्रजी भाषा हा वाद अाता काहीच दिवस होणार अाहे, कारण येत्या काही वर्षातच मातृभाषा संपून सर्वरुपी इंग्रजी भाषाच या देशात येणार अाहे. जीएसटीमुळे एक देश एक कर अशी करप्रणाली लागू झाली, त्याचप्रमाणे एक देश एक भाषा अशी संकल्पना रुजायला फार वेळ लागणार नाही. अापली मातृभाषा टिकावी, मातृभाषेतील शाळा टिकाव्या असं वाटत असेल तर अातापासूनच काहीतरी पावलं उचलायला हवीत. अजूनही वेळ गेलेली नाही. हातावर मोजण्याइतपतच मराठी शाळा राहिल्या अाहेत. त्याही नष्ट झाल्या तर  भाषा जिवंत राहण्याचं साधनचं संपेल. 

Tuesday, 11 July 2017

एप्रिलच्या ३० तारखेला रिझल्ट लागला की आम्ही १ मे ला गावी पळायचो. तेव्हा लक्झरी बसेसची क्रेझही फार कमी होती. ट्रेन किंवा एस.टी हे दोनच पर्याय कोकणातील चाकरमन्यांसाठी असयाचे. महिनाभर गावाला राहायचं म्हणजे किती सामान घ्यावं लागायचं! एसटी एकदाची सुटली की पुढच्या महिन्याभरात काय काय करायचं याचं प्लँनिंग आखलं जायचं. त्यात भर म्हणून की काय कोणाचं लग्न असेल तर मग बच्चे कंपनीची मज्जा ठरली म्हणूनच समजा. संदेशवहनाची साधने त्याकाळी फार कमी असत त्यामुळे गावाला कोण येणार याची कल्पना नसायची. मात्र कोणाचं लग्न असेल तर काका, काकू, मामा, मामी, आत्या हे सारे येणार हे गृहीतच धरलं जायचं. गावचं घर जसजसं जवळ येत जातं तसतशी हुरहुर अधिक वाढलेली असायची. घरी जाऊन आजी आजोबांना कधी भेटतोय असं व्हायचं. कोकणातल्या काही भागात बारमाही शेती असते तर काही भागात केवळ मान्सुन शेती पाहायला मिळते. त्याचबरोबर काही भागात बारमाही नद्या वाहतानी दिसतात तर काही भागात मे महिन्यात कोरड्या नद्या असतात. आंबा, फणस, काजुगर, जांभुळ, करवंद या फळांच्या चवी चाखण्यासाठी लोक गावाला येत असतात. ही फळं मुंबईलाही मिळतात की, पण गावाची मजा ती गावालाच येणार ना. मला माझ्या लहानपणीचे दिवस अाजही आठवतात. आम्ही गावची सगळी चिल्लर कंपनी मिळून घरातले झोेपेपर्यंत पत्ते खेळत असू, एकदा का घरातले गाढ झोपले की भर उन्हात आम्ही आंबे अाणि करवंद खायाला जात असू. घरात हापूस आंब्याच्या पेट्या भरलेल्या असल्या तरी झाडावर आंबे काढून ते चोखून खाण्यात मजा काही औरच असायची. दुपार सरत आली की घरी जायचो, जर फ्रेश व्हायचो आणि पुन्हा फिरतीवर निघायचो. रोज संध्याकाळी आमची ठिकठिकाणी पिकनीक ठरलेली असायची. तेव्हा आम्ही थोडीथोडकी पोरं नव्हतो.तब्बल ४०-५० जणांचा आमचा चमू असायचा. मग आमचे दादा आणि ताईमंडळी आमच्या हुकुमत गाजवत रस्त्यावर निट चाला, गाड्या बघा वगैरेच्या सुचना द्यायचे. तेव्हाचे सारे रस्ते मातीच्या पायवाटीचे असायचे त्यामुळे त्या रस्त्यावरून चालण्याची मजा काही औरच असायची.
आता मात्र गावाची व्याख्या बदलली आहे. आपल्या माणसांमध्ये रमण्याची ओढ कमी होत जातेय. काही कार्यक्रम असेल तरच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मंडळी जमा होतात. शिक्षण,नोकरी यामुळे काहींना येता येत नाही. शहरं जशी स्मार्ट झाली, त्याचप्रमाणे गावंही स्मार्ट झाली. शेणामातीने सारवलेलं घर, घरासमोर असणारी आंबा, फणसाची झाडं, अंगणातली तुळस, तुळशीसमोर रोज न चुकता काढली जाणारी रांगोळी, घरातल्या ओटीवर बसून मारलेल्या गप्पा आता फक्त आठवणीत उरल्या आहेत. शेणामातीची आ
स्वप्न

उगीचंच स्वप्नांची गाठोडं बांधून अापण सैरावैरा पळत असतो. कधी स्वप्न साकार करायला तर कधी अपेक्षांच्या ओझ्याखालून वाहून जायला. कितीतरी रात्री अापण अशीच स्वप्नांची गाठोडी बांधत जागे असतो. स्वप्न किती, अपेक्षा किती कशाचा काहीच ताळमेळ नाही. जगात अालोय तर काहीतरी करून दाखवायला. पण काहीतरी म्हणजे काय हे अायुष्याच्या उत्तरार्धापर्यंतही काहींना समजत नाही तर काहीजण वयाच्या दुसऱ्या वर्षीही अापली स्वप्न साकार करतात. हाताची पाचही बोटं सारखी नसतात, मग प्रत्येकाचं नशीब सारखं कसं असेल हा विचार करत अापण पुढेपुढे जात असतो. प्रयत्न करूनही, मेहनत घेऊनही जेव्हा अापली स्वप्न स्वप्नंच राहतील असं वाटू लागतं तेव्हा अापण खचतो, मागे येतो, किंवा अाहोत तिथेच थांबतो. तिथून दुसरी स्वप्न पाहायला लागतो. अापल्याला साध्य होतील अशीच स्वप्न पाहतो.